शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून संभाजीराव भिडेंचा विश्वासघात : शिवप्रतिष्ठानचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 21:45 IST

सांगली : कोरेगाव-भीमा दंगल होऊन तीन महिने होऊन गेले तरी, सरकारने खरे सूत्रधार अजूनही समाजासमोर आणले नाहीत. गेल्या तीन-चार वर्षांत संभाजीराव भिडे वडू-बुद्रुक (जि. पुणे) येथे फिरकलेही नाहीत.

ठळक मुद्देआंबेडकरांवर कारवाई न केल्यास न्यायालयात जाणार

सांगली : कोरेगाव-भीमा दंगल होऊन तीन महिने होऊन गेले तरी, सरकारने खरे सूत्रधार अजूनही समाजासमोर आणले नाहीत. गेल्या तीन-चार वर्षांत संभाजीराव भिडे वडू-बुद्रुक (जि. पुणे) येथे फिरकलेही नाहीत. तरीही त्यांच्याविरुद्ध दंगलीचे मुख्य सूत्रधार म्हणून गुन्हा दाखल करून सरकारने भिडेंचा विश्वासघात केला आहे, असा आरोप शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. प्रकाश आंबेडकर यांना दंगलीस जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

चौगुले म्हणाले, आंबेडकर हे थोर महान व्यक्तीचे वंशज आहेत, याचे भान त्यांनी ठेवावे. सर्वच पक्ष जातीचे राजकारण करीत आहेत; पण आम्ही कोणत्याही पक्षावर अवलंबून नाही. २८ मार्चला आमचा मोर्चा निघेलच. दोन समाजात तेढ निर्माण करून जातीय दंगली भडकविण्याचा काहीजणांचा अजूनही उद्योग सुरू आहे. पुण्यात घेण्यात आलेली एल्गार परिषद ही जातीय दंगल भडकविण्यासाठीच होती. याचे संयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. भिडे यांचा दंगलीशी काहीही संबंध नाही. अगदी यमाला चौकशीसाठी नेमले तरी, सत्यच बाहेर येईल. कोरेगाव-भीमा दंगलीचा कट कोणी रचला? हे समाजासमोर आले पाहिजे. सरकार याप्रश्नी का गप्प आहे? हे समजत नाही. २८ मार्चच्या मोर्चानंतरही भिडे यांच्यावरील गुन्हे सन्मानपूर्वक मागे घेतले नाही तर, आम्ही दिल्लीत मोर्चा काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दाद मागणार आहोत. भिडे दोषी आहेत का नाहीत? याचे निवेदन करण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे.

चौगुले म्हणाले, २८ मार्चला राज्यभर, जिल्हास्तरावर मोर्चे काढले जाणार आहेत. बेळगाव, विजापूर, गोवा येथेही मोर्चे निघतील. अन्य राज्यात केवळ निवेदन दिले जाणार आहे. मोर्चाचे मुख्य केंद्र सांगली आहे. कर्मवीर चौकातून सकाळी दहा वाजता मोर्चास प्रारंभ होईल. राम मंदिर, काँग्रेस भवन, आझाद चौक या मार्गावरून हा मोर्चा स्टेशन चौकात जाऊन त्याचे सभेत रूपांतर होईल. सातजणांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यास जाणार आहे. कोणाचीही भाषणे होणार नाहीत. केवळ निवेदन दिले जाणार आहे. एक लाख कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होतील. मोर्चातील सहभागी लोकांना १८ ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. रुग्णवाहिकाही ठेवल्या आहेत. आंबेडकर स्टेडियम, नेमिनाथनगर व शंभर फुटी रस्त्यावर पार्किंगची सोय केली आहे.आम्ही उघडे पाडूचौगुले म्हणाले, संभाजीराव भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत. पुण्यातील एल्गार परिषदेत भाषणे करणाºया वक्त्यांवर गुन्हे दाखल करावेत. २ जानेवारील पुकारण्यात आलेल्या बंद काळात तोडफोडीत जे नुकसान झाले ते संबंधितांकडून वसूल करावे, या मागण्यांसाठी मोर्चा काढला जाणार आहे. जातीय विष पसरवरलं जात आहे. भिडेंना जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे. जाती-जातीमध्ये विष पेरणाºयांना आम्ही उघडे पाडू.सांगलीतील तपास थांबलासांगलीत ३ जानेवारीला बंद पुकारुन त्यास हिंसक वळण लावण्यात आले. तोडफोड करुन खासगी व शासकीय मालमत्तेचं लाखो रुपयांचे नुकसान करण्यात आले. तोडफोड करणाºया व्हिडीओ चित्रीकरणात कैदही झाले. अज्ञांताविरुद्ध गुन्हे दाखल केले. मात्र पोलिसांनी केवळ सात संशयितांची नावे निष्पन्न केली. यातील केवळ तिघांना अटक केली. पुढे तपास झालाच नाही. तपास जाणीवपूर्वक थांबवून संशयितांना पोलिसांनी एकप्रकारे अभय दिला असल्याचे चित्र आहे.